रायगडच्या शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करत मांडले रस्त्यांचे वास्तव; काही तासात रस्ता झाला दुरूस्त
रायगड जिल्ह्यातील खांडपे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या फक्त अनुभवली नाही, तर तिचे अभिनव पञकार पद्धतीने दस्तऐवजीकरण केले. कर्जत-कोंदिवडे मार्गाची दयनीय अवस्था दाखवणारा त्यांचा छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेहा घारे हिने रिपोर्टरची भूमिका निभावली तर मानसी पवार हिने कॅमेरा हाताळला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रायगड जिल्ह्यातील खांडपे (Raigad District Khandpe) येथील जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) विद्यार्थिनींनी रस्त्यावरील खड्ड्यांची (Female student Potholes on the road) समस्या फक्त अनुभवली नाही, तर तिचे अभिनव पञकार पद्धतीने दस्तऐवजीकरण केले. कर्जत-कोंदिवडे मार्गाची (Karjat-Kondivade Road) दयनीय अवस्था दाखवणारा त्यांचा छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाला जागा आली आणि काही तासात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करून रस्ता दुरूस्त करण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणा देत आनंद व्यक्त केला.
रस्त्याच्या दूरावस्थेची माहिती देताना नेहा घारे हिने रिपोर्टरची भूमिका निभावली तर मानसी पवार हिने कॅमेरा (Manasi Pawar Camera) हाताळला. हातात छत्री घेऊन माईक म्हणून वापरत त्यांनी बातमीची नक्कल केली. ही कृती केवळ तक्रार नव्हती, तर शिक्षणातून मिळालेल्या निरीक्षणशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्याचा प्रत्यक्ष वापर करत त्यांनी रस्त्याचे वास्तव मांडले.त्याचा फार मोठा परिणाम पाहायला मिळाला.
व्हिडिओत मुलींनी रस्त्यावरील खड्डे, वाहनचालनातील अडचणी आणि पावसाळ्यातील वाढलेली समस्या सोप्या भाषेत मांडली. मोठमोठ्या शब्दांऐवजी रोजच्या अनुभवातून आलेली वस्तुस्थिती स्पष्ट केली. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना सामाजिक समस्या ओळखणे, माहिती गोळा करणे आणि प्रभावी संवाद साधणे शिकवते. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना वाढते आणि ते केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहत नाहीत.

शिक्षण व्यवस्थेत अशा प्रकारच्या प्रयोगांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. मुलींनी पत्रकारितेची मूलभूत कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे आणि सादरीकरण हे सर्व त्यांनी स्वतःच आत्मसात केले. यामुळे त्यांना समस्या सोडवण्याची जबाबदारी समजली आणि प्रशासनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. शाळांमध्ये असे प्रकल्प राबवल्यास विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर समाजासाठी विचार करायला शिकतात. हेच खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे लक्षण आहे.
सध्या मध्यामांमध्ये व्हायरल होणाऱ्या या छोट्या व्हिडिओने दाखवले की, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर शाळकरी मुलेही सामाजिक बदलाचे वाहक बनू शकतात. छत्रीचा माईक आणि कॅमेरा हाताळत त्यांनी केवळ रस्त्यांची पोलखोल केली नाही, तर शिक्षणाच्या व्यावहारिक मूल्याचीही आठवण करून दिली. अशा उपक्रमांना शाळा, पालक आणि प्रशासन यांनी पाठिंबा दिला तर भविष्यात अधिक जागरूक आणि सक्रिय पिढी घडेल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.कारण या एका कृतीमुळे गावचा रास्ता दुरूस्त झाला. रस्त्याने जाता येताना होणारा त्रास नाहीसा झाला.
View this post on Instagram